राज्यातील मत्स्योत्पादनात २९ हजार टनची वाढ
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- राज्यातील मत्स्योत्पादनात २९ हजार १८४ टन वाढ झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये राज्याचे ४ लाख ३४ हजार ५७५ टन होते, २०२४-२५ मध्ये ते वाढून ४ लाख ६३ हजार ७५८ टनवर पोहोचले आहे. गेल्या मासेमारी हंगामात मत्सोत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले होती. मात्र हंगामात मत्सोत्पादनात पुन्हा वाढ झाल्याने मत्स्यव्यवसायायिकांना दिलासा मिळाला.
गेल्या काही वर्षात राज्यातील मच्छीमारांना विवीध प्रकाराच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले होते. करोना काळातील टाळेबंदीमुळे मत्स्य व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यानंतर निसर्ग आणि तौक्ते वादळांचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसला होता. गेल्या हंगामातली हवामानातील बदलांचा फटका मासेमारी बसलो होता. मात्र यावर्षीचा हंगात हवामानाची साथ मिळाल्याने मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला.
जिल्हा निहाय मत्स्योत्पादन
जिल्हा मत्स्य उत्पादन
पालघर ३१ हजार १८१ टन
ठाणे ५४ हजार ४५७ टन
मुंबई उपनगर ७५ हजार २५४ टन
बृहंमुंबई १ लाख ७३ हजार ०९१ टन
रायगड ३५ हजार ०२७ टन
रत्नागिरी ७१ हजार ३०३ टन
सिंधुदुर्ग २३ हजार ४४५ टन