मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अतिमुसळधार पावसाचा इशारा

26

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अतिमुसळधार पावसाचा इशारा

कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747

मुंबई :- प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (IMD) यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (SEOC), मंत्रालय, मुंबईकडून दि. २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना चेतावणी (रेड अलर्ट) चा इशारा देण्यात आला आहे.

घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच ढगफुटीचा धोका निर्माण होवू शकतो. नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या असून पुढील उपाय योजना आखण्याचे निर्देश दिले आहेत.

पूर्व तयारी आणि उपाययोजना:

१. जिल्हा सक्रियताः सर्व जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवावेत.

२. शहरी पूर तयारीः सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करण्यात यावे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्या इमारतीवर CSSR च्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.

३. वीज व रस्ते पायाभूत सुविधाः दुरुस्ती पथक, साखळी आरे व फीडर संरक्षण युनिट तैनात करावे.

४. धरण निरीक्षणः कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणांसाठी दररोज आढावा घेण्यात यावा.

५. जनतेसाठी माहिती प्रसारः आपत्ती पूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत असुन, त्यानुसार नागरिकांनी सतर्क रहावे.

नागरिकांना सूचित करून
अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धोकादायक भागात जाणे टाळावे.

पुर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे.
वीजा पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे.

पुरापासुन बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी.

पुराच्या आपत्तीपासुन वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे.

पुर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे.

पुर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना, रस्ता ओलांडु नये.

अफवांवर विश्वास ठेवू नये.

संभाव्य पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्हयांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक-

१. धाराशीव- ०२४७२-२२७३०१

२. सोलापूर- ०२१७-२७३१०१२

३. बीड- ०२४४२-२९९२९९

४. अहिल्यानगर – ०२४१-२३२३८४४

५. परभणी – ०२४५२-२२६४००

६. नांदेड-०२४६२-२३५०७७

७. लातूर – ०२३८२ २२०२०४

८. रायगड- ८२७५१५२३६३

९. रत्नागिरी- ७०५७२२२३३

१०. पालघर- ०२५२५ २९७४७४

११. सिंधुदुर्ग – ०२३६२ २२८८४७

१२. ठाणे- ९३७२३३८८२७

१३. पुणे- ९३७०९६००६१

१४. सातारा- ०२१६२ २३२३४९

१५. मुंबई शहर आणि उपनगर- १९१६/०२२ ६९४०३३४४.

राज्य स्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्रातील संबंधित अधिकारी यांचेशी संपर्क साधण्यासाठी सदर कार्य केंद्रामध्ये २४४७ अधिकारी/कर्मचारी उपलब्ध असुन त्यांचे दुरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

> ०२२-२२०२७९९०

> ०२२-२२७९४२२९

> ०२२-२२०२३०३९

– ९३२१५८७१४३

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (SEOC), मंत्रालय, मुंबई.