Home मुंबई शेतकरी मोर्चातून शहरी माओवाद डोकावतोय

शेतकरी मोर्चातून शहरी माओवाद डोकावतोय

124

नवी दिल्ली: आपल्या न्याय्य मागण्यांसाठी २०० किलोमीटरची पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी मोर्चाचा भाजपनं माओवादाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी मोर्चात शहरी माओवाद डोकावतोय, त्यावर चर्चा झाली पाहिजे, असं अजब तर्कट भाजप खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी मुंबईत आले. त्यांच्या मागण्यांचा सरकारने गंभीरपणे विचार करायला हवा. मात्र या मोर्चात आलेल्यांच्या हातात लाल फित आहे आणि कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा आहे, असं सांगतानाच देशात शहरी माओवाद डोकावताना दिसत आहे. त्याची सुरुवात पुण्यातून झाल्याचं पूनम महाजन यांनी सांगितलं. महाजन यांच्या वक्तव्याचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून महाजन यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे. आपल्या मागण्यांसाठी पायपीट करत आलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांचा हा अपमान असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.