राज्यसभा निवडणूक बिनविरोध; रहाटकरांची माघार

186

मुंबई:भाजपच्या उमेदवार विजया रहाटकर यांनी आज, गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाराष्ट्रातील सहा जागांसाठी होणारी राज्यसभेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. सहा जागांसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक, तर भाजपने चार उमेदवार रिंगणात उतरवल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र, आता रहाटकर यांनी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नारायण राणे, मुरलीधरन यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेने अनिल देसाई, राष्ट्रवादीने वंदना चव्हाण आणि काँग्रेसने कुमार केतकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी भाजपकडून विजया रहाटकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे चुरस निर्माण झाली होती. मात्र, रहाटकर यांनी आज अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतला. रहाटकर यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी मागे घेतला असून, आता प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि मुरलीधरन हे भाजपचे अधिकृत उमेदवार असतील, असे राज्याचे मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.