मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात कॅनडाच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेवर अभिनेता अक्षय कुमार याने उत्तर दिलंय. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेबद्दल मला अजिबात वाईट वाटलं नाही, असं अक्षय कुमार म्हणाला. मुंबईत एका कार्यक्रमात तो बोलत होता.
अक्षयचे सिनेमे आणि त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून राज यांनी गुढीपाडव्या दिवशी झालेल्या भाषणात सडकून टीका केली होती. देशाचा कळवळा दाखवणाऱ्या अक्षयकडे कॅनडाचे नागरिकत्व का आहे? असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता.
राज यांच्या टीकेवर बोलताना अक्षयने त्यांच्या टीकेचं मला काहीच वाईट वाटलं नाही. आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकालाच हवं ते बोलण्याचा अधिकार हक्क आहे, असे अक्षय म्हणाला.