गोल्ड कोस्टः

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन फायनलमध्ये तेजस्विनीने रौप्य पदक जिंकत महाराष्ट्रासह देशाची मान अभिमानाने उंचवली आहे. या स्पर्धेत तेजस्विनीसोबत भारताची अंजुम मोदगिलही सहभागी झाली होती.

दुसरीकडे, कुस्तीत बीडचा पैलवान राहुल आवारेकडे आता महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. ५७ किलो वजनी गटात राहुल आवारेने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता सुवर्णपदाकासाठी राहुलची लढत कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीसोबत होणार आहे. उपांत्य फेरीत राहुलने पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालला १२ विरुद्ध ६ गुणांनी आस्मान दाखवलं. राहुलच्या या विजयाने भारताचे रौप्य पदक निश्चित झाले असले तरी त्याच्याकडून आता सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here