भिवंडी तालुक्यात वसतीगृहात आग; विद्यार्थी सुखरूप.
✒राज शिर्के प्रतिनिधी ✒
भिवंडी,दि.30 मार्च:- तालूक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील सोनाळे ग्रामपंचायत क्षेत्रात येथे एका वसतीगृहात आग लागली. या आगीत वसतीगृहातील अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यास यश आलंय.
मुंबई नाशिक महामार्गावर सोनाळे ग्रामपंचायत मध्ये येणा-या रम लॉजिस्टीक कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ईडीयु लाईट या संस्थेचे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना वसतीगृह असून या वसतीगृहात आग लागली आहे. आणि यात 74 विद्यार्थी अडकले होते. यावेळी भिवंडी आणि कल्याण अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्व विद्यार्थ्यांना रेस्क्यू करून सुटका केली आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.