दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला नववी-दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन 11 वीसाठी वैकल्पिक सीईटी.

53

दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला नववी-दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन 11 वीसाठी वैकल्पिक सीईटी.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला नववी-दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन 11 वीसाठी वैकल्पिक सीईटी.
दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला नववी-दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन 11 वीसाठी वैकल्पिक सीईटी.

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी 30 गुण, प्रात्यक्षिकसाठी 20 गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी 50 गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली.

शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाबाबतची पद्धती तयार करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोविड स्थितीत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाले होते. त्याची नोंद सरल प्रणालीत आहे, असे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी सांगितले आहे.