वर्धा जिल्हातील जनतेला आज पासून लॉकडाउन मध्ये दिलासा.
✒आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
वर्धा दिनांक1:- 14 एप्रिल पासून सुरु असलेल्या कडक संचारबंदीतून वर्धा जिल्हातील जनतेला आज मंगळवार 1 जूनपासून पासून दिलासा देण्यात आला आहे. वर्धा जिल्हातील सर्व अत्यावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी राहील.
तसेच इतर सर्व दुकानं सोमवार, मंगळवार व बुधवार या 3 दिवस सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हयातील उर्वरीत भागात अत्यावश्यक तसेच इतर सर्व प्रकारची वस्तू व सेवांची दुकाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक दुकानदार व ग्राहकांनी मास्क लावणे बंधनकारक राहील.
हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहील. वैद्यकीय सेवा व इतर आणिबाणीच्या परिस्थिती वगळता सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजे नंतर तसेच नागरी व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोलपंप सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील असे जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या आदेशात करण्यात आले आहे.