नांदेड जिल्ह्यात पिकस्पर्धा खरीप हंगाम 2021 चे आयोजन.

51

नांदेड जिल्ह्यात पिकस्पर्धा खरीप हंगाम 2021 चे आयोजन.

नांदेड जिल्ह्यात पिकस्पर्धा खरीप हंगाम 2021 चे आयोजन.
नांदेड जिल्ह्यात पिकस्पर्धा खरीप हंगाम 2021 चे आयोजन.

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
नांदेड (जिमाका) दि.2:- जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागातील शेतकरी अनेक प्रयोग करुन उत्पादकतेत वाढ करतात. याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादकतेत भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन जिल्ह्याच्या एकुण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवुन जिल्हयात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासुन पुर्वीच्या पिकस्पर्धच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे.

सध्याच्या पिकस्पर्धेतील महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी पिकस्पर्धेतील समाविष्ट पिके यात भात, ज्वारी, मका, नाचणी (रागी) तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल असे एकुण 11 पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 एवढी आहे. पिकस्पर्धा मध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग नागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबंधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.

तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या ही सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 एवढी आहे. स्पर्धत भाग घेणा-या शेतक-र्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी पिकस्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रुपये राहिल.

अर्ज दाखल करण्याची तारीख मुग व उडीद पीकासाठी 31 जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल पिकासाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत राहिल. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या स्पर्धकांचे अर्ज विहीत नुमन्यामध्ये भरुन त्यासोबत ठरवुन दिलेले प्रवेश शुल्क चलन, सात-बारा, 8-अचा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पुर्तता करुन तालुका कार्यालयात द्यावे.

पिकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप हे तालुका पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसे रुपये पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये तर तिसरे 2 हजार रुपये तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसचे बक्षिस 5 हजार रुपये एवढे राहिल. पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या WWW.Krishi.maharashtra. Gov.in या संकेतस्थ्ळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहाय्य्क, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. रब्बी हंगाम 2020 मध्ये पिकस्पर्धेसाठी जिल्हायातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतक-यांनी मुग व उडीद पिकांसाठी 31 जुलै पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आर. टी. सुखदेव उप विभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी सर्व शेतक-यांना केले आहे.