निवडणूक आयोगाने डिसेंम्बर २०२१ ते फरवरी २०२२ पर्यंत राज्य चे नगर परिषदा/नगरपंचायती मुदत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
खलील वृत्त या प्रमाणे आई
:चंद्रपूर महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोगाने डिसेंम्बर २०२१ ते फरवरी २०२२ पर्यंत मुदत संपणाऱ्या महाराष्ट्रातील नगर परिषदा/नगरपंचायती नवनिर्मित नगरपालिका/नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना निर्गमित करण्यात आल्या आहे अपवाद केवळ मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळले आहे यानुसार डिसेंबर २०२१ ते फरवरी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाची व्यापकता लक्षात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे या करिता प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही करणे आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे यावर्षी बहुप्रभाग पद्धती ऐवजी एक प्रभाग पद्धती नुसार रचना असेल व २०११ च्या जनगणनेच्या नुसार प्रभाग पद्धती ठरविण्यात येईल.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागील सार्वत्रिक निवडणूकित वर्तमान स्थितीत झालेला बदल उदा. पूल, नवीन रस्ते इमारती इ लक्षात घेऊन नकाशे तयार करावेत सदर प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही ही २३ ऑगस्ट २०२१ पासून करण्यात यावी कच्चा आराखडा तयार होताच राज्य निवडणूक आयोगाला ईमेल द्वारे लगेच कळविण्यात यावा जेणेकरून आयोगाला पुढील कारवाई करता येईल तसेच प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करतांना गोपनीयता बाळगणे आवश्यक आहे याम