एक प्रभाग तीन सदस्य पद्धत लोकशाहीला घातक : रामदास आठवले

एक प्रभाग तीन सदस्य पद्धत लोकशाहीला घातक : रामदास आठवले

एक प्रभाग तीन सदस्य पद्धत लोकशाहीला घातक : रामदास आठवले

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. -9768545422

लोणावळा दि.4ऑक्टोबर : – राज्यात अतिवृष्टीने मराठवाडा, विदर्भ या भागाीतील शेतकऱ्यांचे अतोनत नुकसान झाले आहे. यामुळे ठाकरे सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची नुकसानभरपाई द्यावी. तसेच दलित अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रोसिटी कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करावी; महिलांवरील अत्याचार रोखवेत आणि अत्याचार पीडित महिलांना राज्य सरकारकडून ५० लाखांची मदत द्यावी; ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे, अशा विविध मागणीसाठी येत्या दि. २० ऑक्टोबर रोजी राज्यातील तहसील कचेरी आणि जिल्हा अधिकारी कार्यालयांवर आंदोलन करणार असल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केली.

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने(आठवले) पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक लोणावळा येथील कुमार रिसाॅर्ट येथे आयोजित केली होती. या बैठकीत रामदास आठवले बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपसोबत रिपब्लिकन पक्षाची युती करावी आणि भाजपने रिपब्लिकन पक्षाला प्रत्येक महापालिकेत जागा सोडाव्यात, असा ठराव या पक्षाच्या राज्य कार्यकारणीत मंजूर झाला. ‘एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राज्य सरकारची एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लोकशाहीला घातक आहे. या तीन सदस्य पद्धतीला रिपब्लिकन पक्ष तीव्र विरोध करेन, गरज पडल्यास पक्ष न्यायालयात जाऊन विरोध करेन’, अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली.

दरम्यान,’राज्यात आगामी विधानसभा निवडणुका रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावरच लढल्या पाहिजेत. त्यासाठी राज्यात विधानसभा मतदारसंघ कार्यकर्त्यानी तयार करावेत. मनपा निवडणूकीत भाजप सोबत युती करून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यानी आपले मतदारसंघ मजबूत बांधावेत, असे आवाहन रामदास आठवले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.