पत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षे कैद…!!!
५०,००० हजार रुपये दंड किंवा तीन वर्षाची शिक्षा वा दोन्हीही ठोठावण्यात येईल
✍ भवन लिल्हारे ✍
* उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा “
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
मुंबई :- दिनांक ८ मार्च रोजी पत्रकारांवर वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार आणि प्रसार माध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक अखेर महाराष्ट्र विधानसभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आले आहे. यानुसार आता पत्रकार मध्यामनंतर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षाची शिक्षा किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्हीही, अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
तसेच पत्रकारांवरील हल्ला दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे. महाराष्ट्र प्रसार माध्यम संस्था आणि ( हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध ) अधिनियम २०१७ या नावाने हा कायदा अस्तित्वात येणार आहे.विधानसभेत चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.