रस्त्यासाठी लाखो रुपये खर्चूनही आदिवासी महिलेचा मृतदेह आणला चार किलोमीटर झोळीतून

236
रस्त्यासाठी लाखो रुपये खर्चूनही आदिवासी महिलेचा मृतदेह आणला चार किलोमीटर झोळीतून

रस्त्यासाठी लाखो रुपये खर्चूनही आदिवासी महिलेचा मृतदेह आणला चार किलोमीटर झोळीतून

रस्त्यासाठी लाखो रुपये खर्चूनही आदिवासी महिलेचा मृतदेह आणला चार किलोमीटर झोळीतून

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-लाडके सरकार च्या बढाया मारत हजारो किलोमीटरच्या रस्त्यांचे जाळे विणल्याच्या वल्गना करणाऱ्या शिंदे सरकारचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पेण सुधागडचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या घरापासून निव्वळ चार-पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या खवसावाडी येथील आंबी राग्या कडू या मृत आदिवासी महिलेचे मृतदेह झोळीत टाकून नेण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव नदीतील खौसावाडी आदिवासी वाडी येथे साठ लाख रुपये खर्चूनही प्रत्यक्षात रस्ताच नसल्यामुळे गुरुवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी आंबि राघ्या कडू वय ४२ वर्ष ह्या आदिवासी मृत महिलेचा मृतदेह पेण ते खवसावाडी असे सुमारे पाच किलोमीटर झोळीत टाकून न्यावा लागल्याने आदिवासी समाजाला वालीच उरला नसल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

दरम्यान ग्राम संवर्धन सामाजिक संस्था ही सामाजिक संस्था मागील दोन वर्षांपासून येथील खवसावाडी,काजुचीवाडी,केळीचीवाडी,तांबडी, आणि उंबरमाळवाडी ह्या पाचही आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मागील दोन वर्षांत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित सर्व विभाग कार्यालांयावर मोर्चे आंदोलने काढून ह्या आदिवासींच्या वाट्याला आलेला विकास निधी रायगड जिल्हा परिषद पेण उपविभागाचे अभियंता आणि ठेकेदारांनी गीलंकृत केला असून याबाबतची माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असतात तीही देण्यात आलेली नाही विशेष म्हणजे ह्याच आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांसाठी ०१ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा एकदा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला ७ कोटी ६० लाख रुपयांचा ठेका देण्यात आला आहे मात्र आज १० महिने उलटूनही ह्या रस्त्याचेही काम ठेकेदाराने सुरू केलेला नाही त्यामूळे येथील आदिवासीना मात्र रस्त्या अभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यूला कवटाळावे लागते. अशा परिस्थितीत पेण सुधागड मतदार संघाचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांचे निवासस्थानापासून चार ते पाच किलोमीटर वर असलेल्या ह्या वाड्यांमध्ये आमदार एकदाही पोहोचले नसल्याचे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे असून याबाबत आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रस्त्यांची वस्तुस्थिती पाहायला गेलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खवसावाडीतील आदिवासी भगिनीचा सवाल “साहेब रस्ता नाही मग माझ्या डिलिव्हरीसाठी मी दवाखान्यात कशी जाऊ” ? मुख्य कार्यकारी अधिकारी निऋत्तर शुक्रवारी खवसावाडीतील आदिवासी भगिनीचे मृतदेह चार किलोमीटर झोळीतून नेल्याच्या बातम्या नंतर निद्रिस्त जिल्हा परिषद प्रशासनाला आली जाग. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्यासह गटविकास अधिकारी,कार्यकारी अभियंता उप अभियंत्यांचा लवाजमा पोहोचला थेट खवसावाडीत. मात्र वस्तुस्थितीवर बोलायला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा नकार.