राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्याचे कामबंद आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्याचे कामबंद आंदोलन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- सरकारी सेवेतील समावेशासह विविध मागण्या साठी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ६०० हुन अधिक अधिकारी व कर्मचारी ह्यांनी १९ तारखेपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे सरकारी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवेसह अतिदक्षता विभाग , लसीकरण औषध वितरण यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या डायलेसिस आणि नवजात कक्ष हे दोन विभागातील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत परंतु दोन दिवसात शासनाकडून निर्णय न झाल्यास त्या विभागातील कर्मचारी बेमुदत आंदोलनातं सहभागी होणार आहेत अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती चे रायगड चे अध्यक्ष विकास धुमाळ ह्यांनी दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती अंतर्गत विविध आरोग्य कामगार संघटना प्रथमच यामध्ये सक्रिय झाल्या आहेत. यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग असल्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होणार आहे. हे सर्व सरकारी रुग्णालयात आरोग्य विभागाच्या नियमित सेवेत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात. परंतु त्यांना पगार कमी मिळतो १० वर्षापेक्षा अधिककाळ सेवेत असलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ७० संवर्ग आहेत. शासनाच्या २०२४ मध्ये सहसा निर्णय जारी करून त्यांना सरकारी सेवेत संयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यापैकी केवळ चतुर्थ श्रेणीतील आणि चालक ह्यांचेच समायोजन झाले उर्वरितांच्या तोंडाला पाने पुसली.
२०२२ मध्ये समायोजनाचा आदेश उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दिले होते त्यावर ३० टक्के मंजूर पदावर समायोजनाचा निर्णय घेण्यात आला पण दीड वर्ष झाले तरी हा निर्णय आमलात आणला नाही त्यासह १५ टक्के मानधन वाढ तात्काळ लागू करणे, बदली धोरण भविष्य निर्वाह निधी व विमा योजना सेवेत असताना मृत्यू झाल्यास ५० लाख, व अपंगांत्व आल्य्यास २५ लाख सानुग्रह अनुदान आदी १८ मागण्या मान्य कराव्यात अशी आंदोलकांची मागणी केली आहे.
या पूर्वी ८ जुलै रोजी रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आश्वासन देण्यात आले होते मात्र आद्यपही त्याची पूर्तता न झाल्याने अखेर बेमुदत संप करावा लागला असल्याचे विकास धुमाळ ह्यांनी सांगितले.