विध्यार्थ्यांची समस्या घेऊन थेट राजुरा आगाराला दिली भेट
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा:- ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी नुकतीच महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात मोठी गोषणा केली आहे. ग्रामीण भागातून येणारे विध्यार्थी आपल्या ध्येयाप्रयन्त पोहचले पाहिजे या हेतूने शासनाने मोफत बससेवा देण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील सोनुर्ली गावामध्ये बस सेवा उपलब्ध होत नव्हती करिता विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. संबंधित समस्या घेऊन सोनुर्लीचे शाखाप्रमुख राजू भाऊ लोणारे यांनी शिवसेना नेते बबनभाऊ उरकुडे यांना संपर्क साधला आणि आगार व्यवस्थापक मेश्राम साहेबांना भेट देऊन समसेचे निवाकरण केले आणि ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. याप्रसंगी मनोज कुरवटकर, सुनील गौरकर, गणेश चोथले आणि मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.